(आकाशावानिवारा दि. २३ जुलै २०१२ रोजी प्रसारित झालेले भाषण)
मित्रांनो,
या संपूर्ण सृष्टीत जेव्हा माणसाची निर्मिती झाली तेव्हापासून आजपर्यंत माणूस सतत संपन्नतेच्या, समृद्धीच्या आणि परमवैभवाच्या सिद्धतेकडं धाव घेत आहे. प्रचंड कष्टानं त्यानं निरनिराळं संशोधन करून आपला विकास साधला. अनादी काळापासून त्याला संशोधनाची आवड आणि गरज वाटत आली आहे. यातूनच सर्व सोयींनी संपन्न असं सुकर जगणं आपल्या वाट्याला आलं आहे. ‘अवघे विश्वचि माझे घर’ ही श्री.ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेली संकल्पना आज आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत. लाखो किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या व्यक्तीशी आपण अगदी सहज संवाद साधू शकतो. इतकंच नाही तर त्याला आपल्या संगणकाच्या पडद्यावर प्रत्यक्ष पाहू सुद्धा शकतो. काही शतकांपूर्वी ज्ञानदेवांनी मांडलेल्या सिद्धांताची अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जोड आणि त्याची प्रचिती म्हणजे मानवाने गाठलेल्या प्रगतीचा मोठा आविष्कारच म्हणावा लागेल.
मित्रांनो,
या संपूर्ण सृष्टीत जेव्हा माणसाची निर्मिती झाली तेव्हापासून आजपर्यंत माणूस सतत संपन्नतेच्या, समृद्धीच्या आणि परमवैभवाच्या सिद्धतेकडं धाव घेत आहे. प्रचंड कष्टानं त्यानं निरनिराळं संशोधन करून आपला विकास साधला. अनादी काळापासून त्याला संशोधनाची आवड आणि गरज वाटत आली आहे. यातूनच सर्व सोयींनी संपन्न असं सुकर जगणं आपल्या वाट्याला आलं आहे. ‘अवघे विश्वचि माझे घर’ ही श्री.ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेली संकल्पना आज आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत. लाखो किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या व्यक्तीशी आपण अगदी सहज संवाद साधू शकतो. इतकंच नाही तर त्याला आपल्या संगणकाच्या पडद्यावर प्रत्यक्ष पाहू सुद्धा शकतो. काही शतकांपूर्वी ज्ञानदेवांनी मांडलेल्या सिद्धांताची अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जोड आणि त्याची प्रचिती म्हणजे मानवाने गाठलेल्या प्रगतीचा मोठा आविष्कारच म्हणावा लागेल.