1/24/2014

व्हाट वुई कॅन लर्न ङ्ग्रॉम साऊथ कोरिया - पुस्तक परीचय

पुस्तक परीचय

व्हाट वुई कॅन लर्न ङ्ग्रॉम साऊथ कोरिया 
सदानंद कोचे, भाप्रसे (जिल्हाधिकारी, बीड)
प्रकाशक: राहूल प्रकाशन, पुणे
पृष्ठे: 38,, मूल्य: 75 रुपये

शासन नेहमीच सामान्य माणसाचं आयुष्य सुखकर, संपन्न आणि समृद्ध होण्याकरिता प्रयत्नशील असतं. त्यासाठी आवश्यक असणार्‍या व्यवस्था उभारण्याकरिता, चालविण्याकरिता योग्य त्या व्यक्तींची निवड करीत असतं. त्या व्यक्तींच्या क्षमता वृद्धिंगत होण्याकरिता उच्च श्रेणीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांपासून ते कनिष्ठ पातळीवरच्या सर्वांपर्यंत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतं असतं. 

भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍यांकरिता लाल बहादूर शास्त्री ऍकेडमी ऑङ्ग ऍडमिनिस्ट्रेशन, मसुरी येथे ङ्गेज-1, ङ्गेज-2, ङ्गेज-3 अंतर्गत विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.  दहा-बारा वर्षे प्रशासकीय सेवा बजावलेल्या अधिकार्‍यांना मीड करिअर ट्रेनिंग म्हणून ङ्गेज-3 अंतर्गत प्रशिक्षण दिले जाते. बुलडाण्याचे तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आता बीडचे जिल्हाधिकारी असलेले श्री.सदानंद कोचे यांनी ङ्गेज-3 अंतर्गत अलिकडेच मसुरी येथे 60 दिवसांचे प्रशिक्षण घेतले.  त्यांच्या प्रशिक्षणात ‘ङ्गॉरेन एक्स्पोजर’ म्हणून 15 दिवसांच्या विदेशी प्रशासनाचा अभ्यास करण्याकरिता दक्षिण कोरिया या देशाच्या अभ्यास दौर्‍याचा समावेश होता.  दक्षिण कोरिया या प्रगत राष्ट्राला दिलेल्या भेटीवर आधारित ‘व्हाट वुई कॅन लर्न ङ्ग्रॉम साऊथ कोरिया’ हे दोन राष्ट्रांची विषयनिहाय तुलना करणारे, मसुरी येथील प्रशिक्षणाचा अनुभव कथन करणारे आणि राष्ट्रप्रेमाच्या तळमळीतून प्रगटलेले पुस्तक सदानंद कोचे यांनी लिहिले आहे.

वास्तविक अर्ध्या महाराष्ट्राएवढे क्षेत्रङ्गळ असणारे दक्षिण कोरिया या राष्ट्राची क्षेत्रङ्गळाच्या दृष्टिने बलाढ्य असणार्‍या भारताशी तुलना कशी होऊ शकते असा प्रश्न वाचकाला पडणे स्वाभाविक आहे. त्याचे कारण असे की, भारताप्रमाणेच परकीय आक्रमकांनी दक्षिण कोरियावर सुद्धा राज्य केले. आणि स्वातंत्र्याच्या वेळी दोन्ही देश सारख्याच परिस्थितीत होते. मात्र आता स्वातंत्र्यानंतर सहा दशकांहूनही अधिक काळाने भारत विकसनशील राष्ट्र तर दक्षिण कोरिया विकसित राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशात अस्तित्वात आले आहे. या स्पष्टीकरणापासूनच वाचकाच्या दृष्टिकोनातून पडणारे छोटे-छोटे प्रश्न समोर ठेवून लेखकाने वाचकांशी नाते जोडले आहे.

सुरुवातीला लेखकाने मांडलेली भूमिका, इथली व्यवस्था विषद करणारी पार्श्वभूमी, मूळ विषयाचा ऊहापोह करण्यापूर्वी उपयुक्त ठरणारी आहे. त्यानंतर मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री नॅशनल ऍकेडमी ऑङ्ग ऍडमिनिस्ट्रेशन या संस्थेतील सोयीसुविधा, प्रशिक्षणातील विविधता, संस्थेचा परिसर, प्रशिक्षणाचे स्वरुप या सर्वांची ओळख करून दिली आहे. विमानप्रवासाच्या वर्णनापासून सुरु झालेला विदेशदौरा वाचकांनाही विदेशी दौर्‍याची अनुभूती देणारा आहे. 

दक्षिण कोरियातील समाजव्यवस्था, शिक्षण, सुरक्षा, व्यावसायिक शिक्षण, विद्यापीठे, लष्करी शिक्षण, शिस्त, आरोग्य, वैद्यकीय सोयीसुविधा, आहार, लोकसंख्या, दळणवळण, वाहतूक नियंत्रण, उद्योग, क्रीडा, शेती इ. विषयांतर्गत केलेली चर्चा, भारताशी केलेली तुलना तळमळीतून प्रगट झाल्याचे या पुस्तकाच्या पानोपानी जाणवते.

दररोज विद्यार्थ्यांचे शाळेत येताना शिक्षक करीत असलेले स्वागत, पालकांचा पाल्यांना शाळेत पाठविण्याचा उत्साह आणि अशा प्रसन्न वातावरणामुळे शंभर टक्के साक्षर झालेला दक्षिण कोरिया,  शिक्षणामुळे मुलींना वरसंशोधनाचे मिळालेले संपूर्ण स्वातंत्र्य, छोटे राष्ट्र असूनही उभारलेले 45 विद्यापीठे, 16 ते 19 वर्षादरम्यान 2 वर्षांचे सक्तीचे लष्करी शिक्षण, स्वयंशिस्त या गोष्टी लेखकांसमवेतच वाचकांनाही अचंबित करणार्‍या आहेत. लोकसंख्येवर असलेले नियंत्रण, आरोग्याच्या तारांकित परिपूर्ण सोयी आणि सकस आहारामुळे मिळालेल्या सुदृढतेला परिश्रमाची जोड आणि यातून मिळालेले सुखकर आयुष्य यातच द. कोरियाच्या प्रगतीचे रहस्य सामावल्याचे भासते. 

समुद्रावरील 21 किमीच्या जगातील दुसर्‍या क्रमांकाच्या ब्रीजमुळे आणि सशक्त अंतर्गत वाहतुकीमुळे दळणवळणाच्या आणि पर्यायाने द.कोरियाच्या विकासाच्या वाटा सुकर झाल्याचे लेखकाने दर्शवून दिले आहे. 1988 मध्ये कोरियन शासनाने सेऊल याठिकाणी ऑलिपिंक स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्याकरिता 10,000 नव्या सदनिका उभारण्यात आल्या होत्या. या यशस्वी आयोजनामुळे द.कोरिया जगाच्या समोर आले. 2014 साली पुन्हा ऑलिम्पिक स्पर्धा येथेच होणार आहेत. अशाप्रकारे क्रीडा क्षेत्रातही या छोट्या राष्ट्राने मोठी प्रगती साधली. त्याची तयारी 2008 पासूनच सुरु आहे. उद्योगाच्या बाबतीतही द.कोरियाने मोठी प्रगती केली आहे. त्यांची उत्पादने जगात निरनिराळ्या ठिकाणी निर्यात केली जातात.

लेखकाने भूमिकेत वर्णन केल्याप्रमाणे विषयनिहाय वर्णन करताना भारताच्या बाबतीत निदर्शनास आलेले काही कडवे  अनुभवही स्पष्टपणे पुस्तकात मांडले आहेत. त्यात नको त्या गोष्टीतील राजकीय हस्तक्षेप, स्वयंशिस्तीचा अभाव, शिक्षणाची दुरावस्था अशा काही विषयांवर लेखकाने निर्भयपणे चर्चा आणि तुलना केल्याचे दिसते. मात्र हे सारे राष्ट्रप्रेमापोटी आल्याचे जाणवते. भारतीय माणसातील ऊर्जा खरोखरीच प्रज्वलित झाली तर हा देश येत्या 50 वर्षात परमवैभवाकडे जाऊ शकतो असा विश्वास लेखकाने व्यक्त केला आहे. जगाच्या नकाशावर एका बिंदूएवढ्या राष्ट्राकडून आपण काहीतरी का शिकावे याचे उत्तर ‘व्हाट वुई कॅन लर्न ङ्ग्रॉम साऊथ कोरिया’ हे पुस्तक वाचल्यानंतर आपसूकच मिळते आणि हा प्रयत्नही कौतुकास्पद आहे.
पुस्तकात दिलेले ऐतिहासिक संदर्भ, थेटपणे केलेली तुलना, वापरलेले भाषिक सौंदर्य, वाचकांच्या भूमिकेतून केलेले लिखाण, दोन्ही देशांच्या सद्य:स्थितीचा आणि व्यवस्थेचा केलेला अभ्यास पुस्तकाच्या पानोपानी प्रगट होतो. मसुरीच्या प्रशिक्षण केंद्राच्या सौंदर्यापासून ते द.कोरियापर्यंतच्या विकासाची दृष्यांची रंगीत छायाचित्रे समाविष्ट केल्याने वाचकांच्या कल्पनेला प्रतिमेची जोड मिळते.

1/23/2014

योजनांची विकासगंगा - पुस्तक परीचय

पुस्तक परीचय

योजनांची विकासगंगा
गजेंद्र बडे 
सार्थसंकेत प्रकाशन
पृष्ठे: 480 मूल्य: 500 रुपये

समाजातील सर्व स्तराचा विकास साधण्यासाठी शासनाच्या विविध विभागांमध्ये वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. विशेषत: ग्रामविकासाच्या बाबतीत कल्याणकारी योजना राबविणे आणि त्यांची सुयोग्य अंमलबजावणी करणे याचा शासनस्तरावर अधिक प्रयत्न केला जातो. अशा ग्रामीण विकासाच्या बाबतीतील विविध 400 पेक्षा अधिक योजनांचे एकत्रित संकलन ‘योजनांची विकासगंगा’ या पुस्तकात करण्यात आले आहे.

माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेले आणि शासनाच्या कृषिमित्र पुरस्काराने गौरविण्यात आलेले गजेंद्र बडे यांनी या माहितीपूर्ण पुस्तकाचे संपादन-लेखन केले आहे. शासकीय योजनांच्या माहितीचे सलग पावणे दोन वर्षे एका दैनिकात लेखकाने सदर लिहिले होते. त्या लेखांसह अन्य काही योजनांची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. लेखक हे सातत्याने दुष्काळाचा सामना करणार्‍या बीडसारख्या जिल्ह्यातील असल्याने ग्रामीण भागाकरिता शासकीय योजनांची आवश्यकता त्यांना पूर्वीपासून महत्त्वाची वाटत होती. पुढे पत्रकारितेत कारकीर्द घडवताना या विषयाला त्यांनी पुन्हा अधोरेखित केले. त्यातून ‘योजनांची विकासगंगा’ हे पुस्तक साकारले आहे.

या पुस्तकात राज्य व केंद्र शासन, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बँक इत्यादी शासनाच्या पातळीवरील योजनांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, विभागनिहाय योजनांचे वर्गीकरण करण्याऐवजी लेखकाने विषयनिहाय योजनांचे गट करून त्यासंदर्भातील योजनांचा एकत्रित समावेश केला आहे. त्यामुळे वाचकांना हवी असलेली योजना शोधणे अधिक सोयीचे झाले आहे. कृषी, पणन, ङ्गलोत्पादन, पशुसंवर्धन, ग्रामोद्योग व मत्स्यसंवर्धन, शिक्षण, आरोग्य, कामगार व समाजकल्याण, क्रीडा, युवक कल्याण व स्वयंरोजगार, महिला विकास, बालकल्याण, आदिवासी विकास, अपंग व अल्पसंख्यांक, महसूल व वन, टपाल खाते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ग्रामीण विकासाच्या योजना (जिल्हा परिषद), माजी सैनिक कल्याण इत्यादी विषयांचा त्यामध्ये समावेश आहे.

प्रत्येक योजनेची मांडणी एका पानात अगदी नेमक्या शब्दात आणि प्रस्तावना, योजनेचे निकष (पात्रता), आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याकरिताची माहिती या नमुन्यात केल्याने अधिक सुटसुटीतपणा आला आहे. पुस्तकाच्या शेवटी शासनाच्या महत्त्वाच्या संकेतस्थळांचे पत्ते, सविस्तर पत्ता आणि दूरध्वनी क्रमांकासह कृषी संशोधन विषयक महत्त्वाच्या संस्थांची यादी इत्यादी पूरक माहिती समाविष्ट केल्याने वाचकांना संदर्भग्रंथ म्हणूनही या पुस्तकाचा उपयोग होऊ शकतो.

समर्पक मुखपृष्ठ, पुरेसा मोठा टाईप (ङ्गॉंट) आणि आवश्यक त्याठिकाणी रेखाचित्रांचा वापर केल्याने पुस्तक अधिक आकर्षक झाले आहे. या पुस्तकातील योजनांच्या अंमल-बजावणी तसेच कार्यप्रणालीविषयी सविस्तर माहिती शासनस्तरावरून घेण्यात यावी; असे प्रकाशकाने सुरुवातीलाच प्रामाणिकपणाने सूचित केले आहे.
लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, लघुद्योजक, व्यावसायिक आदी वर्गाकडून पुस्तकाला विशेष प्रतिसाद मिळत असून, लवकरच पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे.  शासनाच्या इतर योजनांचे स्वतंत्र पुस्तक (पुस्तके) लिहिण्याचे लेखकाने अक्षरकार्य हाती घ्यावे, अशी वाचकांकडून होत असलेली अपेक्षा या पुस्तकाचे यश अधोरेखित करते.

देशातील एक नागरिक म्हणून आणि शासकीय योजनांचे स्वरूप समजावून घेण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगी ठरेल असा विश्‍वास वाटतो.

1/04/2014

संवाद हृदयाशी...

नव्या वर्षाचे जोरदार स्वागत झाले असेल. थर्टी फर्स्टचा हँग ओव्हर उतरला असेल. एव्हाना कदाचित तुम्हीसुखस्वप्नांच्या दिशेनं तुम्ही कूच केली असेल.  ती कूच अशीच पुढच्या 31 डिसेंबरपर्यंत सुरू ठेवा. दरम्यानच्या काळात तुमच्या आतला हृदयाचा आवाज ऐकत रहा, त्याच्याशी संवाद साधत रहा. स्वत:च्या अंत:करणाशी तादात्म्य पावण्याचं सामर्थ्य तुमच्या ठायी निर्माण झालं की समजा तुमचं जीवन कृतार्थ झालं...
एकाग्र होऊन आपल्या हृदयाच्या आवाजाकडे लक्ष द्या

मी: हृदया, हृदया, ऐकतोस का?

हृदय: तुझा आवाज मी सतत ऐकत असतो. तूच माझा आवाज कधी ऐकत नाहीस.

मी: तुला बोलता येतं?

हृदय: म्हणूनच तर आपण संवाद साधत आहोत ना!

मी: पण तुझ्यापेक्षा आम्ही आमच्या डोक्याशीच संवाद साधतो, मग तो तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे का?

हृदय: प्रत्येकजण आपापल्या जागी श्रेष्ठ आहे. त्यामुळे कोणाची कोणाशीच तुलना होणार नाही.

मी: मग सारे आपल्या डोक्याचं ऐकतात, तुझा आवाज सारेजण का ऐकत नाहीत?

हृदय: मी जे सांगतो ते बहुतेकवेळा कटू आणि अवघड वाटतं. पण तेच सदासर्वदा निर्मळ अन् पवित्र असतं.

मी: याचा अर्थ तू पवित्र आहेस.

हृदय: पवित्र अपवित्राचा प्रश्‍न नाही. तुला योग्य मार्ग दाखविण्याची माझी जबाबदारी मी प्रामाणिकपणाने पार पाडतो.

मी: मग डोकंही ती पार पाडतच ना...

हृदय: पण प्रत्येकवेळी विवेकाचा मार्ग मीच तुला दाखवून देतो.

मी: मग डोकं अविवेकी असतं का?

हृदय: अजिबात नाही. ते ही त्याचं काम करत राहतं. तू ज्या ज्या वेळी जे जे त्याला दिलेलं आहेस; ते ते तो 
साठवून ठेवून त्याप्रमाणे तुला मार्ग दाखवतो. त्याचं काम साठवून ठेवणं, प्रक्रिया करणं एवढं आहे.

मी: तुझ्याकडे ती क्षमता नाही का?

हृदय: ती नसती तर तू जगूच शकला नसतास. प्रेम, कारूण्य, ममत्त्व या संकल्पना जन्माला आल्याच नसत्या.

मी: तुला व्यवहारापेक्षा भावना अधिक महत्त्वाच्या वाटतात का?

हृदय: व्यवहार अन् भावना यांचा भ्रम नको. व्यवहार हा तुम्ही माणसांनी डोक्याच्या सहाय्यानं तयार केलेली संकल्पना आहे. भावना मला मिळालेलं जन्मजात वरदान आहे. तरीदेखिल प्रत्येक वेळी मी भावना आणि व्यवहार यांचा सुवर्णमध्य साधणारा, अन् नैतिकतेचं अधिष्ठान असलेला सल्ला तुला देत असतो.

मी: म्हणजे तुलाही व्यवहार मान्यच!
हृदय: तसं असतं तर तू ऐकत नसतानाही मरेपर्यंत मी तुला सल्ला दिलाच नसता. अन् मी थांबलो, की तुला कोणी मृत घोषित केलं नसतं!
Related Posts Plugin for WordPress, Blogger...