12/27/2014

प्रशासकीय संस्कार

पले राष्ट्र हे विविधतेत एकता साधणारे राष्ट्र आहे. आपल्या देशात विविध धर्माचे, जातीचे, पंथाचे, संप्रदायाचे लोक वास्तव्य करतात. एवढी सारी विविधता असूनदेखील आपण सारे परस्परांचे बंधू आहोत, अशी प्रगल्भ विचारसरणी आपण निर्माण केली आहे. आणि हा बंधुभाव आपण प्रत्यक्ष अंगीकारलेला देखील आहे. हा आपल्यावर झालेल्या संस्काराचाच एक भाग आहे. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी आदर्श दिनक्रम आवश्यक असतो. भारतातील विविध धर्मांनी आदर्श दिनक्रम,  दाखवून दिला आहे.  साधारणपणे यालाच संस्कार असे संबोधता येऊ शकेल.  संस्कार हा मूळ हिंदी भाषेतून आलेला शब्द आहे. सांस्कृतिक वारसा आणि त्याचे जतन असाही अर्थ संस्कार या शब्दातून प्रतीत होतो. माणसाचे आयुष्य हे सामाजिक, सांस्कृतिक, नैतिक दृष्टीने विकसित करण्याकरिता संस्कार मोलाची भूमिका बजावत असतात. जीवनातील काही मूलभूत अत्यावश्यक अशा मूल्यांना केंद्रस्थानी ठेवूनच संस्कारांची निर्मिती आणि त्यांचा विकास झालेला आहे. थोरांचा आदर करावा, सत्य बोलावे, सर्वांचा सन्मान करावा अशा प्रकारच्या काही मूल्यांचा त्यामध्ये समावेश आहे.

अलिकडे अनेक क्षेत्रांमध्ये हळूहळू संस्कार ही संकल्पना रूढ होत आहे. आज  संस्कार या संकल्पनेकडे व्यापक दृष्टिने पाहण्याची गरज आहे. एकविसाव्या शतकात प्रशासन अधिक गतिशील, पारदर्शक आणि लोकसहभागी होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनातही ‘संस्कार’ ही संकल्पना राबविता येऊ शकेल. या संकल्पनेला ‘प्रशासकीय संस्कार’ असे संबोधता येऊ शकेल. शासकीय सेवेत सध्या कार्यरत असणार्‍या आणि विशेषत: नव्याने येऊ इच्छिणार्‍या अधिकारी-कर्मचारी यांच्यावर अशा संस्कारांचे संस्करण करता येऊ शकेल. हे प्रशासकीय संस्कार काय असतील याविषयी चर्चा करूयात.

सर्वांवर प्रेम करा

प्रेम या संकल्पनेकडे अधिक व्यापक दृष्टिने पाहण्याची गरज आहे. प्रेम हे केवळ दोन भिन्नलिंगी व्यक्तींमध्येच असते असे नाही, तर कोणत्याही दोन गोष्टींमध्ये निरपेक्ष प्रेम असू शकते. येथे प्रेम हे अलौकिक अर्थाने अभिप्रेत आहे.

पोथी पढ पढ जग मुआ। 
पंडित भया न कोई॥
ढाई आखर प्रेम के। 
पढे सो पंडित होई॥

कितीही शास्त्रं वाचली, मनुष्य ज्ञानी झाला, पंडित झाला तरी त्याचा उपयोग नाही. ज्याने प्रेमाची अडीच अक्षरे वाचली तोच खरा पंडित होय. असे संत कबीर आपल्या एका वचनात म्हणतात.


शासकीय कार्यालयांमध्ये दररोज विविध कामांच्या निमित्ताने सामान्य नागरिकांचा वावर असतो. कोणत्याही शासकीय अथवा खाजगी काम घेऊन कार्यालयात येणार्‍या व्यक्तीला प्रेमाने, आपुलकीची वागणूक मिळत नाही.  त्यांना ‘बसा, तुमचे काय काम आहे?’ अशीही चौकशीही बर्‍याचदा होत नाही. या पार्श्वभूमीवर कार्यालयात आलेल्या नागरिकांवर बंधुभावाच्या भावनेने पाहून त्यांच्यावर प्रेम करण्याची गरज आहे. कवी रूमी यांनी म्हटले आहे, ‘‘प्रेम शोधणे हे तुमचं काम नाही. पण स्वत:मधील प्रेमाला विरोध करणार्‍या सर्व गोष्टींचा नाश करणे हे तुमचं काम आहे.’’ ज्याप्रमाणे आपण आपल्या घराबाहेर आपल्या कुटुंबातील सदस्यांना  वागणूक देतो, तसेच वर्तन सामान्य नागरिक भेटल्यावर करणे हा एक प्रशासकीय संस्कारच आहे. याशिवाय आपले सहकारी, आपले वरिष्ठ, आपले कनिष्ठ यांना देखील अशाच प्रकारची वागणूक देणे आवश्यक आहे. त्यामुळे जनमानसामध्ये शासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी मदत होईल आणि पर्यायाने शासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील दरी कमी होण्यास मदत होईल. प्रशासनातील सारीच यंत्रणा ज्यादिवशी अशा-प्रकारचा बंधुभाव आणि प्रेमभाव सर्वांप्रती दाखवेल त्यादिवशी आपण खर्‍या अर्थाने विकसित होऊ. सर्वांवर प्रेम करणे हा प्राथमिक ‘प्रशासकीय संस्कार’ असू शकेल. तो प्रत्येकाने स्वत:मध्ये रूजविणे नितांत आवश्यकता आहे.


कामाप्रती निष्ठा













आपण ज्या आस्थापनेमध्ये, ज्या यंत्रणेमध्ये जे काम करतो; त्या कामाप्रती आपली निष्ठा असणे अत्यंत आवश्यक आहे. कामातून मिळणारा मोबदला हा उदरनिर्वाह असतो; तर प्रत्यक्ष केलेले काम हा व्यक्ती विकास असतो. जो मनुष्य आयुष्यभर केवळ जबाबदारी म्हणून काम करतो; तो आयुष्याच्या उतारवयात आयुष्यभर काहीच न केल्याची खंत व्यक्त करत असतो. जेवढे अधिक काम तुम्ही कराल, तेवढे अधिक तुम्हाला शिकायला मिळेल. मग भलेही नव्याने काही शिकताना अनावधनाने चूक झाली तरी चालेल. स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘एखादा दिवस जर तुमची एकही चूक झाली नाही किंवा तुम्हाला एकही संकट आले नाही, तर समजा की तुम्ही चुकीच्या वाटेने प्रवास करीत आहात.’’ म्हणून प्रशासनात काम करत असताना स्वत:च्या आणि पर्यायाने देशाच्या विकासासाठी निष्ठेने, सचोटीने काम करणे हा ही एक महत्त्वाचा प्रशासकीय संस्कार म्हणून संबोधता येईल.

तंत्रज्ञानाचा वापर

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपण सध्या वावरत आहोत. संगणकाचा, तंत्रज्ञानाचा दैनंदिन कामात अधिकाधिक उपयोग करून प्रशासन गतिशील करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ई-ऑफिसच्या, लेस पेपर ऑफिसच्या दिशेने आपली घोडदौड सुरू आहे. अशा परिस्थितीत तंत्रज्ञानाचा वापर आवश्यकच नव्हे, तर अपरिहार्य झाला आहे. पूर्वी ज्यांना लिहिता, वाचता येत नव्हते; त्यांना निरक्षर संबोधले जात होते. लवकरच संगणक साक्षर नसणे म्हणजे निरक्षर असे म्हटले जाईल. प्रशासन सुलभ पद्धतीने आणि गतीने कामकाजासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यावर भर देत आहे. या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानाचा-संगणकाचा वापर हा ही प्रशासकीय संस्कार म्हणून समोर आणता येईल.

शिकण्याची आवड

तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे संस्कार करतानाच तंत्रज्ञान शिकण्याची आवड असली पाहिजे. तसेच दैनंदिन कामात सुलभता येण्यासाठी सहकार्‍यांकडून, कनिष्ठांकडून, वरिष्ठांकडून जे जे शिकायला मिळेल; ते ते शिकत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मोठमोठ्या रूग्णांवर हजारो यशस्वी शस्त्रक्रिया करणार्‍या डॉक्टर्सना चशवळलरश्र झीरलींळींळेपशी म्हणून संबोधले जाते. कारण ते ही प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकत असतात. शिकण्याची निरंतर प्रक्रिया सुरूच असते. ती आवश्यकही असते. केवळ त्यात आवड दाखविली की आपल्याला त्यात अधिक रस निर्माण होईल. शिकण्याची आवड प्रत्येकाला असते. मात्र, आपण काही नवीन शिकले तर आपल्याला अधिक काम करावे लागेल, अशा भ्रमात राहून आपण स्वत:लाच अधोगतीकडे घेऊन जात असतो. त्यामुळे शिकण्याची आवड हा एक ‘प्रशासकीय संस्कार’ होऊ शकतो.

कार्यालयीन स्वच्छता अनेक कार्यालयात अधिकारी कर्मचार्‍यांची भेट घेण्यासाठी अभ्यागतांना ताटकळत उभे राहावे लागते. बर्‍याच कार्यालयात काम करणार्‍यांनी लक्ष घालून आपले कार्यालय स्वच्छ, टापटीप, प्रसन्न ठेवले पाहिजे. ज्यामुळे कामातील उत्साह वाढण्यास मदत होऊ शकेल. त्यामुळे स्वच्छता हा ही एक प्रशासकीय संस्कार आवश्यक आहे.

नैतिक आचरण

नैतिक आचरण हे आपल्या वैयक्तिक निर्णयाशी संबंधित असते. जेव्हा कृती व्यवस्थेच्या मूल्यांशी सुसंगत असते, तेव्हा ते आचरण नैतिक असते. उत्तरदायित्त्व, पारदर्शीपणा आणि गती ही प्रशासनाची काही मूल्ये आहेत. आपला प्रत्येक कार्यालयीन निर्णय या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून घेतला पाहिजे. आपल्या प्रत्येक निर्णयाला नैतिकतेच्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. ज्यावेळी शासकीय यंत्रणेतील प्रत्येक घटक अशा प्रकारची दृष्टी ठेवेल त्यावेळी सगळीकडे समृद्धता पसरलेली पाहायला मिळेल. यामुळे ‘नैतिक आचरण’ हा ही एक प्रशासकीय संस्कार गृहित धरता येऊ शकेल.

प्रशासकीय संस्कार समजून घेतल्यावर हे सारे संस्कार कोणी कोणावर कोठे करावेत असा प्रश्‍न उपस्थित राहणे नैसर्गिक आहे. अर्थातच यातील सर्वच किंवा काही संस्कार अनेकजण अनेक वर्षांपासून प्रत्यक्ष अंमलात आणत असतील. त्यांचे कार्य कौतुकास्पदच आहे. हे संस्कार शासकीय कार्यामधील वरिष्ठांनी आपल्या सहकार्‍यांवर करणे अपेक्षित आहे. प्रसंगी आपण स्वत: आपल्या सहकार्‍यांसह याविषयी चर्चा करू शकता. अर्थातच त्यासाठी प्रत्यक्ष वर्गखोलीतून हे संस्कार करण्याची आवश्यकता नाही. प्रवासात, जेवणाच्या सुटीत जेथे शक्य असेल आणि जेथे अगदी अनौपचारिक वातावरण असेल अशाच वातावरणात याविषयीची चर्चा अधिक फलदायी ठरू शकेल. हे संस्कार एका रात्रीत प्रत्यक्षात अवतरतील असे नाही. तर हळूहळू एक-एक करून अंगिकारणे ही सुप्रशासनाची वाटचाल ठरेल, हे नि:संशय!

(या लेखासाठी मानवशास्त्रज्ञ अनुज घाणेकर यांनी सहाय्य केले आहे.)

(यशदा यशमंथन जानेवारी-मार्च २०१४ मध्ये प्रकाशित)

12/26/2014

तिचे दुःख पिणारा तो…


ती त्याला कधीतरी भेटलेली असते. आणि त्याच भेटीमुळे तो तिच्या मनात घर करून राहिलेला असतो. नकळतपणानं तो तिच्या अगदी खोलवर आत तो विराजमान होतो. पण ती कधी व्यक्त होत नाही. त्याला आतल्या आत दाबून टाकते. त्याचा विचार आतच ठेवते. अगदी इच्छा असतांनाही त्याला तसेच ठेवते, मनाच्या खोल गाभार्‍यात. तो अस्वस्थ होतो. अगदी अचल होतो. तो आतून ओरडून सांगतो, ‘‘फक्त एक संधी दे मला, तुझे दु:ख दूर करण्याची, तुझ्या वेदना संपवून टाकण्याची, गालांवरची... मी येऊन निघून जाईल, कधीच न येण्यासाठी’’ ती ‘नाही’च म्हणते. अगदी शेवटपर्यंत ‘नाही’. तो खूप प्रयत्न करतो. अगदी अखेरपर्यंत. मात्र, ती कठोर होते. ती म्हणत तू आतच रहा. कधीच बाहेर येऊ नकोस. तिच्या ‘नकारा’वर त्याला समाधान मानावे लागते. तिच्या ‘नकारा’समवेत तो जगत राहतो. तरीदेखील तो तिच्या वेदनांशी, तिच्या दु:खांशी समरस होऊन जातो. तो आतल्या आत तिच्याशी समरूप होण्याचा प्रयत्न करतो. ती त्याला शक्य तेवढं दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. कधीच त्याला जवळ येऊ देत नाही. 

एक दिवस एक अवखळ क्षण तिच्या आयुष्यात येतो. त्या अनामिक, अनोळखी, अवखळ क्षणी ती डोळे गच्च मिटून घेते. आणि त्याला आठवण्याचा प्रयत्न करते. अगदी मनापासून. तिच्या दु:खांचा, वेदनांचा तो पराकोटीचा परमबिंदू असतो. अशावेळी तिलाही तो हवाच असतो. पण ती त्याला काहीच बोलत नाही. तिच्या मौनाची भाषा तो चपखलपणानं जाणतो. आणि सारी बंधनं झुगारून देतो. तिच्या दु:खांचा नाश करण्यासाठी तो तळमळत तळमळत तिच्याही नकळत तिच्या गालांवर अगदी अलवारपणे येतो. तिचीच वेदना पिऊन, तीच वेदना दूर करण्यासाठी तो अनावर होतो. तिची दु:ख दूर करण्यासाठी तो तिचेच सांत्त्वन करीत करीत निघून जातो, दूर कुठेतरी पुन्हा न भेटण्यासाठी... पुन्हा कधीच न भेटण्यासाठी... तिच्या अवघ्या शरीरभरावरून प्रेमानं स्पर्श करीत तो निघून जातो. शेवटी तिच्या पदांना स्पर्श करत, तो धरणीशी एकरूप होतो. 
तिचं दु:ख गाडून टाकण्यासाठी. पुन्हा कधीच तिला न भेटण्यासाठी... 

हे वेडं जग तेव्हा तिला ‘रडू नकोस’ म्हणतं. 
अन् हेच वेडं जग तेव्हा त्याला ‘अश्रू’ म्हणून संबोधतं... 
हे वेडं जग तेव्हा त्याला ‘अश्रू’ म्हणून संबोधतं...

12/15/2014

प्रेम नाकारलेल्या प्रेयसीचे पत्र...

प्रेम नाकारलेल्या प्रेयसीचे पत्र...

परवाचे तुझे पत्र मिळाले. ते पत्र केवळ पत्र नव्हते तर भावनांनी ओतप्रोत वाहणारा जलौघ होता. ते वाचून मी खरेच तुझ्या भावनांच्या प्रेमात पडले. अर्थात याचा अनुभव मी यापूर्वीच घेतला होता. त्यादिवशी तुझा ओठ थरथरत होता. तुझे शब्ददेखिल हरवले होते आणि मी समोर बसले होते. तू मला म्हणालास ’तुम्ही मला आवडता’ आणि मी म्हणाले उद्या सांगितले तर चालेल का? त्यानंतर दोन दिवस आपण दोघंही या जगात नव्हतो. तू स्वप्नात जगत होता आणि मी वास्तवात कसे जगावे याचा विचार करत होते. नंतर मी तुला मी माझा नकार कळविला.

तुझा अल्लड, अवखळ, निरागस स्वभाव मला समजत नाही असे तुला वाटते का? तुझ्या डोळ्यातील पवित्र अन मंगल भाव मी जाणत नाही असे तुला वाटते का? तुझ्यासाठी म्हणून सांगते स्त्रीला इश्वराने एक अशी शक्ती दिली आहे की ज्यावरुन ती पुरुषाच्या एका नजरेतून त्याच्या मनातील भाग ओळखू शकते. आपण तर जवळपास वर्षभरापासून एकमेकांना ओळखतो. मर्यादा पाळण्याचे तुझ्याकडे विलक्षण सामर्थ्य आहे. जिंकण्याची जिद्द तुझ्याकडे आहे. पराभव स्विकारण्याचं मोठं मन तुझ्याकडे आहे.

म्हणूनच तुला सांगते स्वप्नांचे जग सोडून आपणांस या जिवंत जगात जगायचे आहे. इथल्या व्यवस्थेने निर्माण केलेले बंधने पाळणे हे आपले कर्तव्य नाही का? माझे तुझ्यावर प्रेम आहेसुध्दा आणि नाहीसुध्दा! तुला जर मी भोगण्यासाठी हवी असेल तर ते या जन्मात शक्य नाही. कारण जगातील कोणतीही स्त्री भोगल्यावर तुला तो आनंद मिळू शकेल.

मात्र तुला प्रेमासाठी त्यागाची अन समर्पणाची भावना स्वतःमध्ये रुजविण्याची गरज वाटत असेल अन तेवढी तुझ्यात पात्रता असेल तर मी तुझीच आहे. प्रेमासाठी तू माझा त्याग करायला तयार आहेस का? या व्यवस्थेच्या भिंतीत जगताना मी तुला काहीही देऊ शकत नाही. म्हणूनच माझा ’नकार’ तुझ्याकडे दिला आहे. त्याच्यावरसुध्दा माझ्याइतकेच प्रेम कर.

आपण एकत्र आलोच नाहीत म्हणून काय झाले. आपण युगानयुगापर्यंत भेटलो नाही म्हणून काय झाले. खरे अन पवित्र प्रेम त्याग, समर्पित भावना यांच्यासह सहवास, संवाद यांच्यापलिकडची अनुभूती असते. त्या अनुभूतीला खरेच नाव नाही. ती भावना शब्दातीत आहे.

हे माझे शेवटचे पत्र आहे. मला विश्वास आहे. तू विवेकी आहेस. मला नक्कीच समजून घेशील. या दिसणा-या जगात जरी आपण भेटू शकलो नाही. तरी इथलं जगणं झाल्यावर त्या न दिसणा-या जगात आपण नक्की भेटू!

तुझी न होऊ शकणारी,

12/10/2014

जेव्हा मन प्रेमात असतं!


12/09/2014

...पण कोणी आतला आवाज ऐकेल का?


नारायणऽ नारायणऽऽ करीत नारदमुनी भगवान विष्णूकडे गेले. आणि भगवान विष्णूला त्यांनी विचारले, ‘देवा,  माणसाचा जगात सर्वांत जवळचा मित्र कोणता?’

श्रीविष्णूंनी मिष्किल हास्य करीत म्हटले, ‘नारदा, आतल्या आवाजाला विचार?’ नारदमुनींना काही उलगडा होईना. तेव्हा श्रीविष्णू म्हणाले, ‘अरे, नारदा माणसाचा आतला आवाज म्हणजेच ‘आत्मा’ त्याचा सर्वात जवळचा मित्र असतो. तो गेला की शरीर थांबते.’ नारदमुनी भगवंतांना अडवत म्हणाले, ‘‘पण तो त्याचा आवाज ऐकत नाही. ना!’ अन् भगवंतांचे म्हणणे ऐकून घेण्यापूर्वीच... (Continue Reading)

12/08/2014

'धैर्य', 'हिम्मत' अन संयम असेल तरच प्रेमात पडा!

तुमच्याकडे प्रचंड "धैर्य' आणि तेवढीच 'हिम्मत' अन संयम असेल तरच प्रेमात पडा. नसता, प्रेमाच्या भानगडीतच पडू नका!

जगभरातील तमाम प्रेम करणारे आणि प्रेम मिळविणारे खूप नशीबवान असतात. प्रेम करण्यासाठी आणि मिळविण्यासाठी तसेच मिळालेलं प्रेम स्विकारण्यासाठी स्वत:च्या ठायी सामर्थ्य असावं लागतं. मग प्रेम निभावणं, लग्नाच्या बेड्यात अडकणं, शरीरानं जवळ येणं या साऱ्या लौकिकार्थाने क्षुल्लक गोष्टी आहेत. जगातील साऱ्या पुरुषांना कोणतीही स्त्री भोगल्यावर एकाच प्रकारचं सुख मिळतं. तर साऱ्या स्त्रियांनाही कोणत्याही पुरुषाकडून एकाच प्रकारचं सुख मिळतं. त्यामुळे 'भोगण्या'पेक्षा खऱ्याखुऱ्या प्रेमाला अधिक महत्व द्यायला हवं.

प्रेम करण्यासाठी प्रेम करणाऱ्याच्या ठायी प्रचंड धैर्य, मोठा संयम आणि स्थिर चित्त असावं लागतं. प्रेमात पडल्यावर वाट पाहणं, उतावीळ न होणं या गुणांना आत्मसात करावं लागतं. तसेच आजूबाजूच्या जगाचं भानही ठेवावं लागतं. बऱ्याच वेळा नव्हे प्रत्येक प्रेमाच्या बाबतीत आपल्याला असं वाटत असतं की आपण जे करत आहोत, ते कोणालाच ठाऊक नसतं.

आपण जे करत असतो ते ठाऊक नसलेलं आपल्या आजूबाजूला कोणीच नसतं. सगळ्यांना सगळं ठाऊक असतं आणि तसं झालं नाही तर नक्की समजा की तुम्ही प्रेम हे वरवरचं आहे, मनापासूनच नाही! 

एखादा मुलगा एखाद्या मुलीच्या प्रेमात पडला तर तिच्यासमोर व्यक्त होण्यासाठी मोठं धैय लागत असतं. तिला 'तू मला आवडतेस' एवढं साधं वाक्‍य म्हणायला जगातील सारी शक्ती खर्ची पडल्यासारखं त्याला वाटत असतं. याशिवाय तिच्याकडून आलेली प्रतिक्रिया पचवायला आणखी धैर्य. अर्थातच ती 'हो' मध्ये असेल तर जगातील सारा आनंद आपल्या वाट्याला आल्यासारखं वाटतं. तर 'नकार'आला तर तो पचवायलाही धैर्यच लागतं.


प्रेमात यश आलं आणि एकत्र येण्यात पुढे काही संकटं आली तर पुन्हा त्यांच्यावर मात करायला हिम्मत लागते. अन्‌ नकार आला तर न कोसळता उभं राहण्यासाठी मोठं बळ लागतं.

त्यामुळे जगभरातील भावी 'प्रेमवीरां'ना एवढचं सांगावसं वाटतं की, तुमच्याकडे प्रचंड "धैर्य' आणि तेवढीच 'हिम्मत' अन संयम असेल तरच प्रेमात पडा. नसता, प्रेमाच्या भानगडीतच पडू नका!
Related Posts Plugin for WordPress, Blogger...