11/07/2013

स्वप्नांचं जग...!!


स्वप्नांचं जग...!!



बघं ना आकाशात किती छान चंद्र आला आहे. त्याच्याभोवती किती किती मस्त चांदण्या आहेत. तो चंद्र एका रथात बसला आहे. त्या रथाला नाजूकश्या हरणांच्या दोन जोड्या आहेत. छोट्या छोट्या चांदण्या त्या रथाभोवती फिरत आहेत. आणि तो रथ आकाशातून आकाशात फिरत आहे. किती विलोभनीय दृश्य आहे ना हे. म्हणूनच तर बघ इतरांना दररोज आकाशातील फक्त तो चंद्र धावताना दिसत आहे. पण आपल्याला तर तो रथातून फिरताना भासत आहे. कारण आपण त्याच्याच जगात आहोत ना! पण मला तर बुवा या सा-या नजराण्यापेक्षाही इथे पृथ्वीवर माझ्या शेजारी बसलेली चांदणीच अधिक आवडते. ती किती गोड हसते. ती किती गोड लाजते. ती किती नाजूक आहे... लाल ओठांची चांदणी.. काळ्या केसांची चांदणी.. बघं बघं तू लाजलीस की नाही?




तो चंद्र जसा सा-या सा-या चांदण्यांना जपतो ना. तसा मी तुला मी जपेल. त्या चंद्राला अनेक चांदण्या आहेत. पण त्या सा-या चांदण्यांची मिळून तयार झालेली एकच चालती बोलती चांदणी देवानं माझ्याकडे पाठविली आहे. तिला मी कधीच सोडणार नाही... कधीच नाही.... मी तिच्यासाठी चंद्र बनेल. एकाच चांदणीचा चंद्र...!!!''

एवढ्यात त्याला जाग आली. तसाच तो तिला भेटायला गेला. ती आणि तो आता स्वप्नात नाही तर सत्यात भेटत होते. तो रथ, ती चांदणी, तो चंद्र.. तो स्वप्नातलं सारं सारं हृदयापासून सांगत होता. ती शांतपणानं ऐकत होती. इतक्यात तो म्हणाला, ''बघं, अश्शी अगदी अशीच तू स्वप्नात लाजली होतीस..'' तिच्या लालसर ओठांवर हळूवार हसू उमटले. ती म्हणाली. ''अरे,स्वप्नाचं जग किती सुंदर असतं ना. आपल्याला हवं ते तिथं पाहता येतं. हव्या त्या व्यक्तीला आपण तिथं कवेत घेऊ शकतो. अगदी त्या व्यक्तीच्या नकळत... पण ते सारे मनाचे खेळ असतात रे. त्यातून जगण्याची ऊर्जा नक्की मिळते. पण त्यासोबतच आपल्याला ख-या जगात पण जगायला हवं. इथल्या जगात लौकिकार्थानं कर्तृत्त्व गाजवायला हवं. कष्ट करायला हवेत. मान उंच करण्याएवढं मोठं व्हायला हवं. स्वप्न कल्पनेसोबतच सत्याच्या अनुभूतीची बघायला पडायला हवीत. उद्याच्या ख-या ध्यासाची बघायला हवीत. आणि ती सत्यात आणण्यासाठी धडपड करायला हवी. प्राणपणाने. माझ्याएवढचं प्रेम त्या स्वप्नांवर करायला हवं. मग पहा आज तू त्या चंद्राचे स्वप्न पाहतोस. उद्या त्या चंद्राला तुझे-माझे स्वप्नं पडतील... आणि आपण खरेच त्या स्वप्नांच्या जगात जगत राहू. सदाकरिता...!!!''

Related Posts:

  • संवाद संपत चालला आहे का? माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्यामुळे त्याला अन्न, वस्त्र, निवार्‍याशिवाय संवादाचीही गरज असते. अर्थात ही गरज अनिवार्य नाही. मात्र सलग २४ तास जर आपण एक शब्दही न बोलता राहिलो तर काय अवस्था येते याचा केवळ विचारच केलेला बरा. स… Read More
  • पेशावर हल्ल्यातील विद्यार्थ्याचे पत्र पेशावरमधील आर्मी स्कूलवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला आज (शुक्रवार) एक महिना पूर्ण झाला. या हल्ल्यात एकूण 132 विद्यार्थ्यांसह एकूण 145 जणांचा बळी गेला. या हल्ल्यात मृत्युमूखी पडलेल्या एका निरागस विद्यार्थ्याने त्या… Read More
  • भ्रमात राहु नका (बोधकथा) गौतम बुद्ध काही शिष्यांना उपदेश करत होते. "आपण जे समजतो तेच सत्य आहे, असे कधीही समजू नका. कदाचित सत्य काही तरी वेगळेच असू शकते. सतत डोळे उघडे ठेवा. जाणीवा जागृत ठेवा.' असा उपदेश बुद्धांनी केला. त्यावर काही शिष्यांना अधिक… Read More
  • कष्टाचे फळ (बोधकथा) एका संयुक्‍त कुटुंबात अनेक जण एकत्र राहात होते. घरात आजोबा, आजी सर्वांत ज्येष्ठ होते. त्यांना पाच मुले होती आणि दहा नातवंडे होती. आजी-आजोबा आता खूप वृद्ध झाले होते. तरीही ते निरोगी होते. त्यांनी मुलांना आणि नातवंडांवर चांग… Read More
  • प्रिय लेकरांनो (मराठी भाषेचे विद्यार्थ्यांना पत्र)... प्रिय विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, ओळखलतं का मला? मी तुमची मायमराठी, मराठी भाषा, तुमची मातृभाषा. माझ्यामुळेच दररोज तुम्ही परस्परांशी संवाद साधू शकता. आज माझा अर्थात मराठीचा राजभाषा दिन. म्हणूनच तर यानिमित्ताने मी तुमच्या… Read More

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...