तो आयुष्यात चांगला सेट झाला होता. त्याच्या आई-बाबांचे घर होते. त्याला
चांगली नोकरीही होती. आता तो वधूसंशोधन करत होता. जवळपास वर्षभराहून अधिक
काळ निघून गेला होता. आई-बाबा, नातेवाईक, वधू-वर संस्था अनेक चांगल्या मुली
आणत होते. मुली पाहण्याचा आकडा दोन डझनाहून वर गेला होता. पण त्याला काही
मुलगी पसंत पडत नव्हती. त्यामुळे वय वाढत चालले होते. त्याची आई-बाबांना
चिंता लागली होती. शिवाय सुयोग्य मुली शोधणे, त्यांच्या पालकांशी बोलणे,
नंतर कांदापोह्याचा कार्यक्रम ठरवणे आदींमुळे आई-बाबा त्रस्त होते. आता
त्यांना हा सारा प्रकार नकोनकोसा झाला होता. मात्र, तो काहीच तडजोड करायला
तयार नव्हता. आतापर्यंत बघितलेल्या अनेक मुली त्याला अगदी अनुरूपच होत्या.
काही काही तर त्याच्यापेक्षा अधिक सरस होत्या. पण याला काही मुलगी पसंत पडत
नव्हती.
एकेदिवशी वधूवर संस्थेच्या एका कार्यशाळेला जाण्याविषयी आई-बाबांनी त्याला सांगितले. त्याला काही ते आवडले नाही. मात्र, आई-बाबांनी त्याच्या मित्राकडून त्याचे प्रबोधन केले. अखेर इच्छा नसतानाही तो कार्यशाळेला जाण्यास तयार झाला. ठरल्याप्रमाणे तो पोचला. ती केवळ अविवाहीत मुला-मुलींसाठी कार्यशाळा होती. मुलींची उपस्थितीही बऱ्यापैकी होती. कार्यशाळेत प्रत्येकाचे वैयक्तिक प्रश्नही विचारात घेतले जात होते. सुरुवातीला विवाहपूर्व समुपदेशनाचे व्याख्याने झाली. त्यानंतर प्रत्येकाचे वैयक्तिक प्रश्न विचारात घेतले जाऊ लागले. एका मुलीने सांगितले, "मला आई-बाबा नसलेला मुलगा हवा आहे, स्वतंत्र राहणारा‘ समुपदेशकाने तिला समजावत सांगितले, "आई-बाबा नसणे ही पूर्वी उणीव समजली जायची. आता ती फॅशन होत चालली आहे. मात्र, त्यामागे आपला वैयक्तिक स्वार्थ पाहणेही हिताचे आहे. उद्या तुझे लग्न होईल. भलेही ते स्वतंत्र राहणाऱ्या मुलाशी. तुम्ही दोघेही नोकरी करणारे. पुढे तुम्हाला मूल होईल. मग मूल मोठे होईपर्यंत त्याचा सांभाळ कोण करणार? पैसे देऊन माणसे मिळतील, पण प्रेम देऊन सांभाळणारी माणसे पैसे देऊन मिळतील का? शिवाय तुमच्या बाळाला आजी-आजोबा कल्पना कशी समजेल? हे सारं बाजूला राहू दे. त्याच मुलाने मोठे झाल्यावर लग्नापूर्वी तुमच्यापासून वेगळं राहिलं तर तुम्हाला चालेल का?‘ आता मात्र कार्यशाळेला एक वेगळेच वळण मिळाले. त्या मुलीचंही समाधान झाल्यासारखं तिच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. त्याचेही लक्षही आता कार्यशाळेकडे वळले.

प्रत्येकजण प्रश्न विचारत होता. त्यातून अनेक नवनवे प्रश्न समोर येत होते. कुणाला दाढी असलेला मुलगा हवा होता. तर कोणाला स्वयंपाक येणारा भावी पती हवा होता. कोणाला आपल्या पाळीव प्राण्याला स्वीकारणारा मुलगा हवा होता. तर कोणाला 24 तास घरात राहणारी मुलगी हवी होती. समुदेशक त्यांच्या पद्धतीने प्रश्नांची उकल करत होते. आता याचा क्रमांक आला, याची सारी पार्श्वभूमी आधीच नोंदवली होती. त्यामुळे त्याने थेट प्रश्नच केला, "मी खूप मुली पाहिल्या पण त्या प्रश्नाचे अपेक्षित उत्तर त्या देऊ शकल्या नाहीत‘ समुपदेशकाने प्रश्न कोणता ते विचारले. त्यावर तो म्हणाला, "मी मुलीला विचारतो की तुम्ही शनिवार-रविवार किंवा सुटीच्या दिवशी काय करता? या माझ्या प्रश्नावर मला अपेक्षित उत्तर देणारी एकही मुलगी मला सापडली नाही‘ त्यावर समुदेशकाने त्याचे अपेक्षित उत्तर विचारले. तो म्हणाला, "जी मुलगी शनिवार-रविवार आपले कपाट आवरते, घर आवरते ती मुलगी मला हवी आहे. पण शनिवार-रविवार सगळ्याच मुली बहुतेक करून फिरायला जातात, मुव्हीला जातात किंवा दिवसभर आराम करतात‘ त्यावर समुपदेशक म्हणाले, "तू एवढ्या मुली पाहिल्या आहेत. तर त्यातील कदाचित प्रत्येकच मुलगी घरातील कपाट किंवा घर आवरत असेल. पण ती गोष्ट त्यांना इतकी क्षुल्लक वाटत असेल की ती तुला कांद्या-पोह्याची कार्यक्रमात सांगावी असे त्यांना वाटत नसेल. तसेच बऱ्याच मुलींनी कदाचित संगितले असेलही, पण तुला हव्या त्या शब्दांत सांगितले नसेल. ही अतिशय किरकोळ गोष्ट आहे. या प्रश्नाऐवजी तू थेट घरातील कपाट किंवा घर कधी आवरते किंवा आवरते का? असा साधा प्रश्न विचारल्यास अधिक अचूक उत्तर मिळाले असते. असो, पण तू हा भ्रम काढून टाक की मुली कपाट आवरत नाहीत. आणि पहा बदल कसा घडेल...‘ समुपदेशकाने अगदी नेमके कारण शोधून दिले होते. त्याच्या मनातही हाच प्रश्न आला. आपण इतके दिवस आपले अपेक्षित उत्तर घेऊनच विचार करत होतो. तिच्या भूमिकेतून आपण कधीच विचार केला नाही.
"आपण बहुतेकदा काहीतरी गृहितकं धरूनच कल्पनाविश्वात रमतो, त्याला समर्पक उत्तराचीच अपेक्षा करतो. मात्र, वास्तवाची किनार जोडायला हवी. स्वत:च्या पलिकडे जाऊन इतरांच्या भूमिकेतून आपण प्रत्येक गोष्टीचा विचार करायला हवा. त्याचवेळी सगळ्या प्रश्नांची उकल होऊ शकते‘ समुपदेशकांनी सर्व उपस्थितांना मोलाचा संदेश दिला.
(Courtesy: eSakal.com)
एकेदिवशी वधूवर संस्थेच्या एका कार्यशाळेला जाण्याविषयी आई-बाबांनी त्याला सांगितले. त्याला काही ते आवडले नाही. मात्र, आई-बाबांनी त्याच्या मित्राकडून त्याचे प्रबोधन केले. अखेर इच्छा नसतानाही तो कार्यशाळेला जाण्यास तयार झाला. ठरल्याप्रमाणे तो पोचला. ती केवळ अविवाहीत मुला-मुलींसाठी कार्यशाळा होती. मुलींची उपस्थितीही बऱ्यापैकी होती. कार्यशाळेत प्रत्येकाचे वैयक्तिक प्रश्नही विचारात घेतले जात होते. सुरुवातीला विवाहपूर्व समुपदेशनाचे व्याख्याने झाली. त्यानंतर प्रत्येकाचे वैयक्तिक प्रश्न विचारात घेतले जाऊ लागले. एका मुलीने सांगितले, "मला आई-बाबा नसलेला मुलगा हवा आहे, स्वतंत्र राहणारा‘ समुपदेशकाने तिला समजावत सांगितले, "आई-बाबा नसणे ही पूर्वी उणीव समजली जायची. आता ती फॅशन होत चालली आहे. मात्र, त्यामागे आपला वैयक्तिक स्वार्थ पाहणेही हिताचे आहे. उद्या तुझे लग्न होईल. भलेही ते स्वतंत्र राहणाऱ्या मुलाशी. तुम्ही दोघेही नोकरी करणारे. पुढे तुम्हाला मूल होईल. मग मूल मोठे होईपर्यंत त्याचा सांभाळ कोण करणार? पैसे देऊन माणसे मिळतील, पण प्रेम देऊन सांभाळणारी माणसे पैसे देऊन मिळतील का? शिवाय तुमच्या बाळाला आजी-आजोबा कल्पना कशी समजेल? हे सारं बाजूला राहू दे. त्याच मुलाने मोठे झाल्यावर लग्नापूर्वी तुमच्यापासून वेगळं राहिलं तर तुम्हाला चालेल का?‘ आता मात्र कार्यशाळेला एक वेगळेच वळण मिळाले. त्या मुलीचंही समाधान झाल्यासारखं तिच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. त्याचेही लक्षही आता कार्यशाळेकडे वळले.

प्रत्येकजण प्रश्न विचारत होता. त्यातून अनेक नवनवे प्रश्न समोर येत होते. कुणाला दाढी असलेला मुलगा हवा होता. तर कोणाला स्वयंपाक येणारा भावी पती हवा होता. कोणाला आपल्या पाळीव प्राण्याला स्वीकारणारा मुलगा हवा होता. तर कोणाला 24 तास घरात राहणारी मुलगी हवी होती. समुदेशक त्यांच्या पद्धतीने प्रश्नांची उकल करत होते. आता याचा क्रमांक आला, याची सारी पार्श्वभूमी आधीच नोंदवली होती. त्यामुळे त्याने थेट प्रश्नच केला, "मी खूप मुली पाहिल्या पण त्या प्रश्नाचे अपेक्षित उत्तर त्या देऊ शकल्या नाहीत‘ समुपदेशकाने प्रश्न कोणता ते विचारले. त्यावर तो म्हणाला, "मी मुलीला विचारतो की तुम्ही शनिवार-रविवार किंवा सुटीच्या दिवशी काय करता? या माझ्या प्रश्नावर मला अपेक्षित उत्तर देणारी एकही मुलगी मला सापडली नाही‘ त्यावर समुदेशकाने त्याचे अपेक्षित उत्तर विचारले. तो म्हणाला, "जी मुलगी शनिवार-रविवार आपले कपाट आवरते, घर आवरते ती मुलगी मला हवी आहे. पण शनिवार-रविवार सगळ्याच मुली बहुतेक करून फिरायला जातात, मुव्हीला जातात किंवा दिवसभर आराम करतात‘ त्यावर समुपदेशक म्हणाले, "तू एवढ्या मुली पाहिल्या आहेत. तर त्यातील कदाचित प्रत्येकच मुलगी घरातील कपाट किंवा घर आवरत असेल. पण ती गोष्ट त्यांना इतकी क्षुल्लक वाटत असेल की ती तुला कांद्या-पोह्याची कार्यक्रमात सांगावी असे त्यांना वाटत नसेल. तसेच बऱ्याच मुलींनी कदाचित संगितले असेलही, पण तुला हव्या त्या शब्दांत सांगितले नसेल. ही अतिशय किरकोळ गोष्ट आहे. या प्रश्नाऐवजी तू थेट घरातील कपाट किंवा घर कधी आवरते किंवा आवरते का? असा साधा प्रश्न विचारल्यास अधिक अचूक उत्तर मिळाले असते. असो, पण तू हा भ्रम काढून टाक की मुली कपाट आवरत नाहीत. आणि पहा बदल कसा घडेल...‘ समुपदेशकाने अगदी नेमके कारण शोधून दिले होते. त्याच्या मनातही हाच प्रश्न आला. आपण इतके दिवस आपले अपेक्षित उत्तर घेऊनच विचार करत होतो. तिच्या भूमिकेतून आपण कधीच विचार केला नाही.
"आपण बहुतेकदा काहीतरी गृहितकं धरूनच कल्पनाविश्वात रमतो, त्याला समर्पक उत्तराचीच अपेक्षा करतो. मात्र, वास्तवाची किनार जोडायला हवी. स्वत:च्या पलिकडे जाऊन इतरांच्या भूमिकेतून आपण प्रत्येक गोष्टीचा विचार करायला हवा. त्याचवेळी सगळ्या प्रश्नांची उकल होऊ शकते‘ समुपदेशकांनी सर्व उपस्थितांना मोलाचा संदेश दिला.
(Courtesy: eSakal.com)
मस्त लेख, आवडला.
ReplyDeleteअनिकेतजी प्रतिक्रियेबद्दल आभार
Deletevery nice blog
ReplyDeleteचैतन्यजी प्रतिक्रियेबद्दल आभार
Delete