पुराणामध्ये, दंतकथांमध्ये किंवा काल्पनिक कथांमधून
आपण बालकांनी केलेल्या करामती ऐकलेल्या आहेतच; मात्र, माहिती
तंत्रज्ञानाच्या युगातही बालके "चमत्कार‘ करत असल्याचे चित्र आहे.
विज्ञानाची कास धरून तंत्रज्ञानातील नव्या प्रवाहांच्या साह्याने जगभरातील
बालके आपल्या प्रतिभेद्वारे जगाला थक्क करत आहेत. लोकप्रिय सर्च इंजिन
"गुगल‘च्या "गुगल सायन्स फेअर‘मध्ये ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते.
तंत्रज्ञानाचा वैविध्यपूर्ण, कल्पक, नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या जगभरातील बालकांच्या प्रयोगांचे स्पर्धावजा प्रदर्शन म्हणजे "गुगल सायन्स फेअर‘. या स्पर्धेत 13 ते 18 वयोगटातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. जगभरातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी निवडक 20 प्रयोगांना अंतिम स्थान देण्यात येते आणि त्यातून विजेत्याची निवड होते. विजेत्यांना अन्य प्रायोजकांमार्फत विविध पुरस्कार, तसेच पुढील प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती आणि अन्य स्वरूपात प्रोत्साहन देण्यात येते. तसेच गुगलच्या माध्यमातून हे प्रयोग जगासमोर मांडले जातात. 2011 पासून सुरू झालेल्या या स्पर्धेची जागतिक माध्यमांकडूनही दखल घेण्यात येते. या स्पर्धेत ऑनलाइन अर्ज भरून सहभागी होता येते.
यंदाची ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यात असून अंतिम वीस प्रयोगांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये अनुरुध गानेसन या अमेरिकेतील 15 वर्षांच्या विद्यार्थ्यांने बर्फ तसेच वीजविरहित रेफ्रिजरेटर तयार केले आहे. दुर्गम भागात वैद्यकीय उपचारासाठी बऱ्याचदा लसीची वाहतूक करणे आवश्यक असते. रुग्णाला तातडीने आणि योग्य त्या तापमानात साठविलेली लस पोचवण्याची आवश्यकता ओळखून विजेशिवाय आणि बर्फाशिवाय 2-8 अंश सेल्सिअस तापमानात लसीची वाहतूक करता येणारे तंत्र अनुरुधने प्रयोगाद्वारे सादर केले आहे. सिंगापूरमधील गिरीश कुमार या 17 वर्षाच्या विद्यार्थ्याने शैक्षणिक अभ्यासक्रमातून प्रश्नपत्रिका तयार करताना शिक्षकांसाठी उपयोगी ठरेल, असे दिलेल्या उताऱ्यावरून बहुपर्यायी प्रश्न तयार करणारे तंत्र विकसित केले आहे, तर अमेरिकेतील दीपिका कुरूप या 17 वर्षांच्या विद्यार्थिनीने टाकाऊ पदार्थ आणि सूर्यप्रकाशाचा वापर करून पाण्यातील विषारी घटक काढून टाकून पाण्याला शुद्ध करणारा प्रयोग सादर केला आहे, तर वातावरणात असलेले पाणी प्रत्यक्ष भांड्यात साठविता यावे यासाठी कॅनडातील 18 वर्षाच्या कॅलविन रायडर नावाच्या विद्यार्थ्याने नवा शोध लावला आहे. त्यासाठी कोणत्याही बाह्य ऊर्जेचा वापर न करता केवळ सौरऊर्जेवर आधारलेले यंत्र विकसित केल्याचे कॅलविनने आपल्या प्रयोगात म्हटले आहे. विषारी दारू पिऊन दगावल्याच्या अनेक घटना जगामध्ये सातत्याने घडत असतात. यावर मात करण्यासाठी तैवानमधील यो हसू आणि जिंग टॉंग विंग या तेरा वर्षांच्या दोन विद्यार्थिनींनी बंद बाटलीचे झाकण न उघडता त्यातील द्रव पदार्थ ओळखता येणारे तंत्र शोधले आहे. द्रवपदार्थ असलेल्या बाटलीला विशिष्ट वजनाच्या ठोकळ्याने धक्का दिल्यास निर्माण होणाऱ्या ध्वनिलहरींमधून बाटलीतील द्रव पदार्थ ओळखता येत असल्याचा दावा या प्रयोगामध्ये केला आहे. त्यातून आतील द्रवपदार्थामध्ये असलेले विषाचे प्रमाणही समजणार आहे. अशा प्रकारचे विविध कल्पक 20 प्रयोग अंतिम स्पर्धेत आहेत.
अशा प्रकारच्या अनोख्या, कल्पक, नावीन्यपूर्ण, जीवनावश्यक प्रयोगांचे प्रदर्शन गुगलने संकेतस्थळाद्वारे जगासमोर सादर केले आहे. यंदाच्या स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून सप्टेंबरमध्ये अंतिम विजेते घोषित होणार आहेत. मूकबधिर व्यक्तींना इतरांशी संवाद साधता यावा यासाठी श्वासातील कंपने शब्दांमध्ये परावर्तित करणारे तंत्र भारतातील अर्श शाह दिलबागी या 16 वर्षांच्या विद्यार्थ्याने मागील वर्षी गुगल सायन्स फेअरमध्ये सादर केले होते. या प्रयोगाला पुरस्कारही प्राप्त झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "डिजिटल इंडिया‘ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर भारताने अशा बालप्रतिभा ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्याची नितांत गरज आहे.
(Courtesy: eSakal.com)
तंत्रज्ञानाचा वैविध्यपूर्ण, कल्पक, नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या जगभरातील बालकांच्या प्रयोगांचे स्पर्धावजा प्रदर्शन म्हणजे "गुगल सायन्स फेअर‘. या स्पर्धेत 13 ते 18 वयोगटातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. जगभरातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी निवडक 20 प्रयोगांना अंतिम स्थान देण्यात येते आणि त्यातून विजेत्याची निवड होते. विजेत्यांना अन्य प्रायोजकांमार्फत विविध पुरस्कार, तसेच पुढील प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती आणि अन्य स्वरूपात प्रोत्साहन देण्यात येते. तसेच गुगलच्या माध्यमातून हे प्रयोग जगासमोर मांडले जातात. 2011 पासून सुरू झालेल्या या स्पर्धेची जागतिक माध्यमांकडूनही दखल घेण्यात येते. या स्पर्धेत ऑनलाइन अर्ज भरून सहभागी होता येते.
यंदाची ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यात असून अंतिम वीस प्रयोगांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये अनुरुध गानेसन या अमेरिकेतील 15 वर्षांच्या विद्यार्थ्यांने बर्फ तसेच वीजविरहित रेफ्रिजरेटर तयार केले आहे. दुर्गम भागात वैद्यकीय उपचारासाठी बऱ्याचदा लसीची वाहतूक करणे आवश्यक असते. रुग्णाला तातडीने आणि योग्य त्या तापमानात साठविलेली लस पोचवण्याची आवश्यकता ओळखून विजेशिवाय आणि बर्फाशिवाय 2-8 अंश सेल्सिअस तापमानात लसीची वाहतूक करता येणारे तंत्र अनुरुधने प्रयोगाद्वारे सादर केले आहे. सिंगापूरमधील गिरीश कुमार या 17 वर्षाच्या विद्यार्थ्याने शैक्षणिक अभ्यासक्रमातून प्रश्नपत्रिका तयार करताना शिक्षकांसाठी उपयोगी ठरेल, असे दिलेल्या उताऱ्यावरून बहुपर्यायी प्रश्न तयार करणारे तंत्र विकसित केले आहे, तर अमेरिकेतील दीपिका कुरूप या 17 वर्षांच्या विद्यार्थिनीने टाकाऊ पदार्थ आणि सूर्यप्रकाशाचा वापर करून पाण्यातील विषारी घटक काढून टाकून पाण्याला शुद्ध करणारा प्रयोग सादर केला आहे, तर वातावरणात असलेले पाणी प्रत्यक्ष भांड्यात साठविता यावे यासाठी कॅनडातील 18 वर्षाच्या कॅलविन रायडर नावाच्या विद्यार्थ्याने नवा शोध लावला आहे. त्यासाठी कोणत्याही बाह्य ऊर्जेचा वापर न करता केवळ सौरऊर्जेवर आधारलेले यंत्र विकसित केल्याचे कॅलविनने आपल्या प्रयोगात म्हटले आहे. विषारी दारू पिऊन दगावल्याच्या अनेक घटना जगामध्ये सातत्याने घडत असतात. यावर मात करण्यासाठी तैवानमधील यो हसू आणि जिंग टॉंग विंग या तेरा वर्षांच्या दोन विद्यार्थिनींनी बंद बाटलीचे झाकण न उघडता त्यातील द्रव पदार्थ ओळखता येणारे तंत्र शोधले आहे. द्रवपदार्थ असलेल्या बाटलीला विशिष्ट वजनाच्या ठोकळ्याने धक्का दिल्यास निर्माण होणाऱ्या ध्वनिलहरींमधून बाटलीतील द्रव पदार्थ ओळखता येत असल्याचा दावा या प्रयोगामध्ये केला आहे. त्यातून आतील द्रवपदार्थामध्ये असलेले विषाचे प्रमाणही समजणार आहे. अशा प्रकारचे विविध कल्पक 20 प्रयोग अंतिम स्पर्धेत आहेत.
अशा प्रकारच्या अनोख्या, कल्पक, नावीन्यपूर्ण, जीवनावश्यक प्रयोगांचे प्रदर्शन गुगलने संकेतस्थळाद्वारे जगासमोर सादर केले आहे. यंदाच्या स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून सप्टेंबरमध्ये अंतिम विजेते घोषित होणार आहेत. मूकबधिर व्यक्तींना इतरांशी संवाद साधता यावा यासाठी श्वासातील कंपने शब्दांमध्ये परावर्तित करणारे तंत्र भारतातील अर्श शाह दिलबागी या 16 वर्षांच्या विद्यार्थ्याने मागील वर्षी गुगल सायन्स फेअरमध्ये सादर केले होते. या प्रयोगाला पुरस्कारही प्राप्त झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "डिजिटल इंडिया‘ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर भारताने अशा बालप्रतिभा ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्याची नितांत गरज आहे.
(Courtesy: eSakal.com)
0 comments:
Post a Comment