जिवंतपणी तुला पत्र लिहिणं म्हणजे धैर्याचं काम आहे. अर्थात हे पत्र तुझ्यापर्यंत कोणत्या माध्यमातून पाठवावं अन् ते तुझ्यापर्यंत पोचेल की नाही, याचीदेखिल खात्री नाही. तरीसुद्धा कदाचित मी तुझ्याकडे आल्यावर तुला माझ्या पत्राची आठवण होईल म्हणून हा पत्रव्याप. तुझे स्मरण किंवा तुझी चर्चाही आम्हा पामरांना भयदायक, अशुभ वाटते. पण जिवंतपणी एकदा तुला तुझ्याबद्दलच्या आमच्या भावना सांगाव्यात म्हणून हा खटाटोप. पुन्हा मेल्यावर ‘अभिव्यक्ती’चं स्वातंत्र्यात तुझ्या राज्यात आहे की नाही कोणास ठाऊक?
कसा आहेस रे तू? लपून लपून राहतोस. कधी ‘धप्पा’ करशील अन् तुझ्या ‘राज्या’त घेऊन जाशील ठाऊक नाही. पण कधीतरी तू सर्वांना तुझ्या राज्यात घेऊन जातोस. आम्ही आपले आमच्याच राज्यात अधिकाधिक ‘जिवंत’ राहण्याचा प्रयत्न करतो. तू आपला आम्हा सर्वांना तुझ्या राज्यात घेऊन जायचा प्रयत्न करतोस. तुझं राज्य कसं आहे रे? तिथं सगळी माणसं असतील ना, सार्यांना वाटतं की तुझ्याकडं आलं की ‘मेलं’ पण ते खरचं मरत असतील का? बरं तू किती मोठा आहेस हे तुलादेखील ठाऊक नसेल. बघ ना, तुझ्याकडे कोणी आला की आम्ही त्याला ‘देव’ झाला म्हणतो. म्हणजे जसं परीसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं; त्याप्रमाणे तुझ्यास्पर्शाने आम्ही ‘देव’ होतो. शिवाय आम्ही ज्या ‘शांती’ला आयुष्यभर शोधायला प्रयत्न करतो, ती तुला भेटल्यावर आम्हाला मिळते. (अर्थात् तेव्हा ती आम्हाला नको असते) मग तरीसुद्धा तू सर्वांना नकोनकोसा का वाटतो? तुझ्याबाबतीतलं बाबा सारं सारं गूढच आहे आणि त्याची उत्तरं शोधणं हे त्यापेक्षा अधिक मोठं गूढ! एकवेळ सागराची खोली मोजणं शक्य आहे, आकाशाचं अनुमान करणंदेखील शक्य होईल पण तुझा शोध घेणं ‘जिवंत’पणी शक्य होणार नाही.
आम्ही कोणाकोणाला घाबरत नाहीत; फक्त तू सोडून. तू सत्य आहेस. अंतिम सत्य. तू देवत्त्व बहाल करणारा दाता आहेस. कारण आम्ही मरू नयेत म्हणून जगत राहतो. अर्थात तू जगण्याचं बळ आहेस. तू युगायुगांपासून आहेस. तुझ्याठायी कोणताही भेदभाव नाही. रंग, रूप, जात, धर्म, पंथ, संप्रदाय, वेष, भूषा-भाषा वगैरे कसले कसलेच भेदभाव असत नाहीत. जगात तू एकटाच असशील की जे तुला आवडतात, त्यांना तू क्षणार्धात आपल्या ‘कवेत’ घेऊ शकतोस. कदाचित तू अमर असावास. कारण जोपर्यंत जन्म आहे तोपर्यंत तू आहेस. तू आहेस म्हणून आम्हा माणसांना किमान एका ‘भीती’ची तरी जाणीव आहे. त्यामुळे तू अमर रहा, जन्म असेपर्यंत अन् मरेपर्यंत. बाकी प्रत्यक्ष भेटल्यावर सविस्तर बोलूच!
धन्यवाद
मरेपर्यंत तुझाच,
कसा आहेस रे तू? लपून लपून राहतोस. कधी ‘धप्पा’ करशील अन् तुझ्या ‘राज्या’त घेऊन जाशील ठाऊक नाही. पण कधीतरी तू सर्वांना तुझ्या राज्यात घेऊन जातोस. आम्ही आपले आमच्याच राज्यात अधिकाधिक ‘जिवंत’ राहण्याचा प्रयत्न करतो. तू आपला आम्हा सर्वांना तुझ्या राज्यात घेऊन जायचा प्रयत्न करतोस. तुझं राज्य कसं आहे रे? तिथं सगळी माणसं असतील ना, सार्यांना वाटतं की तुझ्याकडं आलं की ‘मेलं’ पण ते खरचं मरत असतील का? बरं तू किती मोठा आहेस हे तुलादेखील ठाऊक नसेल. बघ ना, तुझ्याकडे कोणी आला की आम्ही त्याला ‘देव’ झाला म्हणतो. म्हणजे जसं परीसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं; त्याप्रमाणे तुझ्यास्पर्शाने आम्ही ‘देव’ होतो. शिवाय आम्ही ज्या ‘शांती’ला आयुष्यभर शोधायला प्रयत्न करतो, ती तुला भेटल्यावर आम्हाला मिळते. (अर्थात् तेव्हा ती आम्हाला नको असते) मग तरीसुद्धा तू सर्वांना नकोनकोसा का वाटतो? तुझ्याबाबतीतलं बाबा सारं सारं गूढच आहे आणि त्याची उत्तरं शोधणं हे त्यापेक्षा अधिक मोठं गूढ! एकवेळ सागराची खोली मोजणं शक्य आहे, आकाशाचं अनुमान करणंदेखील शक्य होईल पण तुझा शोध घेणं ‘जिवंत’पणी शक्य होणार नाही.
आम्ही कोणाकोणाला घाबरत नाहीत; फक्त तू सोडून. तू सत्य आहेस. अंतिम सत्य. तू देवत्त्व बहाल करणारा दाता आहेस. कारण आम्ही मरू नयेत म्हणून जगत राहतो. अर्थात तू जगण्याचं बळ आहेस. तू युगायुगांपासून आहेस. तुझ्याठायी कोणताही भेदभाव नाही. रंग, रूप, जात, धर्म, पंथ, संप्रदाय, वेष, भूषा-भाषा वगैरे कसले कसलेच भेदभाव असत नाहीत. जगात तू एकटाच असशील की जे तुला आवडतात, त्यांना तू क्षणार्धात आपल्या ‘कवेत’ घेऊ शकतोस. कदाचित तू अमर असावास. कारण जोपर्यंत जन्म आहे तोपर्यंत तू आहेस. तू आहेस म्हणून आम्हा माणसांना किमान एका ‘भीती’ची तरी जाणीव आहे. त्यामुळे तू अमर रहा, जन्म असेपर्यंत अन् मरेपर्यंत. बाकी प्रत्यक्ष भेटल्यावर सविस्तर बोलूच!
धन्यवाद
मरेपर्यंत तुझाच,
Greate Sir... chakka Mrutula patra pathawalat aapan....
ReplyDelete