"बाबा, प्रवासासाठी शुभेच्छा, या मी तुमची वाट पाहतोय!‘ पोराने फोन ठेवला.
वडिलांनी पोराला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. पोरगाही मोठा शिकून परदेशात
नोकरी करत होता. आणि आज तर त्याने चक्क वडिलांनाही काही दिवसांसाठी
आपल्याकडे बोलाविले होते. तरीही आपला एवढा चांगला देश सोडून तू एवढ्या दूर
जातोस याबद्दल वडिलांची काही अंशी नाराजी होतीच.
सारी औपचारिकता पूर्ण झाली. बाबांसोबत आईसुद्धा परदेशी जायला निघाली होती. संध्याकाळची फ्लाइट होती. आठवड्याचा पहिलाच दिवस होता. घरापासून विमानतळापर्यंत जाण्यासाठी एक मित्र त्याची चारचाकी घेऊन आला होता. नियोजित वेळेपेक्षा तीन तास आधीच निघण्याचे ठरले. मात्र, मित्राला नंतर काही काम असेल म्हणून काहीही तक्रार न करता आई-बाबा निघाले. जाताना अनेक ठिकाणी सिग्नल लागले. गाड्याचे हॉर्न वगैरे कानावर पडत होते. दुचाकीवरून प्रवास करणारे शक्य तेथून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. "पुढे जाणे‘ हे सगळ्यांचे ध्येय होते. पण त्यासाठी सिग्नल मोडण्याचाही पराक्रम अनेक जण करत होते. अर्थात त्यात त्यांना अभिमानच वाटत होता. अशाच सिग्नल असताना इकडून-तिकडून काही येत नसल्याने अनेक जण आमच्या मागून पुढे गेले. अशाच एका ठिकाणी तर यांची गाडी एका मोठ्या अपघातातून बचावली. पण त्यामुळे सगळेचजण घाबरून गेले. अशातच कसेबसे विमानतळही आले. वेळेअगोदरच पोचेल असे वाटत असतानाच अगदी योग्य वेळेत विमानतळावर गाडी पोचली. आई-बाबा विमानापर्यंत पोचलेही. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे ते अपेक्षित स्थळीही पोचले. स्वत:चा देश त्यांनी प्रथमच सोडल्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीचे अप्रुप वाटत होते. सगळेजण नियमांचे पालन करत होते, सिग्नल पाळत होते, सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं. घरी आल्यावर मुलाकडून कुतूहलाने अनेक गोष्टी जाणून घेता-घेता रात्र झाली.
एवढ्या दूर आपला मुलगा कर्तृत्त्व करून आल्याचे त्यांना पुन्हा एकदा कौतुक वाटू लागले. "लहानपणी त्याचा हात माझ्या हातात होता. आज माझ्या हातात त्याचा हात होता. माझा हात हातात घेऊन त्याने मला घरात आणले‘, मुलाच्या कर्तृत्वामुळे बाबांचे डोळे पाणावले. आई-बाबांच्या अशाच गप्पा बराच वेळ सुरु होत्या. मुद्दामच मुलानेही त्यांना काही अडथळा आणला नाही. घराच्या गॅलरीमध्ये दोघे जण बराच वेळ गप्पा मारत होते. बघता बघता रात्रीचे दोन वाजले. समोर चकाचक रस्ते दिसत होते. कोठेही अस्वच्छता नाही. कर्णकर्कश हॉर्नचा आवाज नाही. सगळीकडे निरव शांतता. रस्त्यावर काहीच वर्दळ नव्हती. सगळा देश शांत झोपल्यासारखा भासत होता. पण अद्यापही सिग्नल सुरूच. लाल, हिरवा रंग चालू-बंद होत होता. तेवढ्यात मुलाची आई म्हणाली, "अहो, एवढ्या रात्री कोण पाळणार सिग्नल‘ तेवढ्यात भरधाव वेगात येत असलेली एक मोटार सिग्नलवरील लाल रंग पाहून थांबली आणि हिरव्या रंगाची प्रतिक्षा करू लागला.
आई-बाबांनी एकमेकांकडे पाहिले. त्यांना अपार कौतुक वाटले. विमान प्रवासापूर्वी दिवसाढवळ्या वाहतूकीला अडथळा निर्माण करत सिग्नल तोडून धावणाऱ्या माणसांची उभयतांना आठवण झाली. मात्र त्या देशापासून ते कितीतरी दूर होते. ते अशा देशात होते की जेथे मध्यरात्री रस्ता रिकामा असताना हिरव्या सिग्नलची वाट पाहणारी माणसे दिसत होती.
सारी औपचारिकता पूर्ण झाली. बाबांसोबत आईसुद्धा परदेशी जायला निघाली होती. संध्याकाळची फ्लाइट होती. आठवड्याचा पहिलाच दिवस होता. घरापासून विमानतळापर्यंत जाण्यासाठी एक मित्र त्याची चारचाकी घेऊन आला होता. नियोजित वेळेपेक्षा तीन तास आधीच निघण्याचे ठरले. मात्र, मित्राला नंतर काही काम असेल म्हणून काहीही तक्रार न करता आई-बाबा निघाले. जाताना अनेक ठिकाणी सिग्नल लागले. गाड्याचे हॉर्न वगैरे कानावर पडत होते. दुचाकीवरून प्रवास करणारे शक्य तेथून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. "पुढे जाणे‘ हे सगळ्यांचे ध्येय होते. पण त्यासाठी सिग्नल मोडण्याचाही पराक्रम अनेक जण करत होते. अर्थात त्यात त्यांना अभिमानच वाटत होता. अशाच सिग्नल असताना इकडून-तिकडून काही येत नसल्याने अनेक जण आमच्या मागून पुढे गेले. अशाच एका ठिकाणी तर यांची गाडी एका मोठ्या अपघातातून बचावली. पण त्यामुळे सगळेचजण घाबरून गेले. अशातच कसेबसे विमानतळही आले. वेळेअगोदरच पोचेल असे वाटत असतानाच अगदी योग्य वेळेत विमानतळावर गाडी पोचली. आई-बाबा विमानापर्यंत पोचलेही. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे ते अपेक्षित स्थळीही पोचले. स्वत:चा देश त्यांनी प्रथमच सोडल्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीचे अप्रुप वाटत होते. सगळेजण नियमांचे पालन करत होते, सिग्नल पाळत होते, सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं. घरी आल्यावर मुलाकडून कुतूहलाने अनेक गोष्टी जाणून घेता-घेता रात्र झाली.
एवढ्या दूर आपला मुलगा कर्तृत्त्व करून आल्याचे त्यांना पुन्हा एकदा कौतुक वाटू लागले. "लहानपणी त्याचा हात माझ्या हातात होता. आज माझ्या हातात त्याचा हात होता. माझा हात हातात घेऊन त्याने मला घरात आणले‘, मुलाच्या कर्तृत्वामुळे बाबांचे डोळे पाणावले. आई-बाबांच्या अशाच गप्पा बराच वेळ सुरु होत्या. मुद्दामच मुलानेही त्यांना काही अडथळा आणला नाही. घराच्या गॅलरीमध्ये दोघे जण बराच वेळ गप्पा मारत होते. बघता बघता रात्रीचे दोन वाजले. समोर चकाचक रस्ते दिसत होते. कोठेही अस्वच्छता नाही. कर्णकर्कश हॉर्नचा आवाज नाही. सगळीकडे निरव शांतता. रस्त्यावर काहीच वर्दळ नव्हती. सगळा देश शांत झोपल्यासारखा भासत होता. पण अद्यापही सिग्नल सुरूच. लाल, हिरवा रंग चालू-बंद होत होता. तेवढ्यात मुलाची आई म्हणाली, "अहो, एवढ्या रात्री कोण पाळणार सिग्नल‘ तेवढ्यात भरधाव वेगात येत असलेली एक मोटार सिग्नलवरील लाल रंग पाहून थांबली आणि हिरव्या रंगाची प्रतिक्षा करू लागला.
आई-बाबांनी एकमेकांकडे पाहिले. त्यांना अपार कौतुक वाटले. विमान प्रवासापूर्वी दिवसाढवळ्या वाहतूकीला अडथळा निर्माण करत सिग्नल तोडून धावणाऱ्या माणसांची उभयतांना आठवण झाली. मात्र त्या देशापासून ते कितीतरी दूर होते. ते अशा देशात होते की जेथे मध्यरात्री रस्ता रिकामा असताना हिरव्या सिग्नलची वाट पाहणारी माणसे दिसत होती.
0 comments:
Post a Comment