नुकतेच त्याचे लग्न ठरले होते. तसे त्याचे ‘ऍरेंज्ड
मॅरेज‘ होते. पण त्यांच्यात आता मैत्री वाढली होती. दोघांच्या पसंती
आल्यानंतर लग्न ठरले. त्यामुळे दोघांच्या मर्जीनेच तीन-चार महिन्यांनंतरचा
मुहूर्त काढण्यात आला. मुलीच्या घरची परिस्थिती फार संपन्न नव्हती.
मुलगा-मुलगी दोघेही सज्ञान असल्याने दोघांच्या परस्पर संमतीनेच लग्न अगदी
साध्या पद्धतीने कोणताही बडेजाव न करता करायचे ठरले. तशी औपचारिक चर्चाही
झाली होती. मुलाच्या आईला हे काही फार पसंत पडले नव्हते. लग्न कसे थाटात
व्हावे वगैरे तिला वाटत होते. पण मुलाच्या हट्टापायी तिने आपला विचार
बाजूला ठेवला. तरीही नातेवाईक-मैत्रिणींसमोर लग्नाविषयीची तिची नाराजी
व्यक्त व्हायची.

एकेदिवशी त्याचे कोणीतरी दूरचे दोन-तीन नातेवाईक घरी राहायला आले. त्याच्या आईची आणि त्यांची चर्चा सुरू झाली. त्यामध्ये लग्नाच्या तयारीबाबत वगैरे चर्चा झाली. त्यावर नातेवाईकांनी "तुमचा एकुलता एक मुलगा, पोराचं काय ऐकता हो? लग्न थाटामाटात करायचं! जा मुलीच्या घरी आणि सांगून टाका. लग्न थाटामाटातच करायचे आहे म्हणून!‘ त्या सर्वांचेच त्यावर एकमत झाले. मग त्यासाठी स्नेहभेटीच्या निमित्ताने मुलीच्या घरी जाऊन एक बैठक घ्यायचेही ठरले. त्याप्रमाणे मुलीकडच्यांना फोनही केला. सुटीच्या दिवशी भेटीसाठी संध्याकाळची वेळ ठरली. मुलगा या सगळ्या प्रक्रियेत सहभागी नव्हता. पण हा सारा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत होता. आता सगळेच मोठे असल्याने त्याला मध्येच असे बोलणे बरे वाटले नाही.
स्नेहभेटीतील बैठकीचा दिवस जवळ जवळ येत होता. मुलीला हा सारा प्रकार सांगणे मुलाला बरे वाटले नाही. त्याची आतल्या आत कुचंबणा होत होती. दरम्यान नातेवाईक आणि मुलाची आई मुलाच्या लग्नाच्या भव्यतेचे स्वप्न रंगवत होते. तर याची घुसमट आणखीनच वाढत होती. तरीही त्याने "हे सगळं थांबवा‘ असा आग्रह केला. पण "तू आमच्यात पडू नको‘ म्हणत त्याला रोखण्यात आले. आता त्याचा संयम सुटत चालला होता. तरीही तो काही करू शकत नव्हता.
स्नेहभेटीनिमित्त होणाऱ्या बैठकीचा दिवस उजाडला. तोपर्यंत सर्वांनी तयारी पक्की केली होती. भूमिका ठाम आणि स्पष्ट ठेवण्याची तयारी केली होती. मुलालाही येण्याचा आग्रह धरण्यात येत होता. पण त्याने स्पष्ट नकार दिला. तो सकाळीच बाहेर कुठेतरी निघून गेला. भेटीची वेळ संध्याकाळची होती. दिवस पुढे जात होता. सर्वांची उत्सुकता वाढत होती. या सर्वांत सकाळी बाहेर पडलेला मुलगा परत आलाच नसल्याचे कोणालाच भान नव्हते. साधारण दुपार उलटत होती. दुपारचे पाच वाजत होते. तासाभरात निघण्याची वेळ होणार होती. दरम्यान दारावरची बेल वाजली. दार उघडायला त्याची आई गेली. दार उघडल्यानंतर तिला जबरदस्त धक्का बसला. कारण समोर तिचा मुलगा लग्न ठरलेल्या मुलीसोबत लग्न करून घरी आला होता. ‘तुम्ही माझे ऐकत नव्हता. मलाही ते सांगता येत नव्हते. मग काय आम्ही माझ्या आणि तिच्या कोणाच्याच घरी न कळवता थेट नोंदणी पद्धतीने लग्न केले आणि आलो घरी‘, त्याने खुलासा केला.
(Courtesy: eSakal.com)

एकेदिवशी त्याचे कोणीतरी दूरचे दोन-तीन नातेवाईक घरी राहायला आले. त्याच्या आईची आणि त्यांची चर्चा सुरू झाली. त्यामध्ये लग्नाच्या तयारीबाबत वगैरे चर्चा झाली. त्यावर नातेवाईकांनी "तुमचा एकुलता एक मुलगा, पोराचं काय ऐकता हो? लग्न थाटामाटात करायचं! जा मुलीच्या घरी आणि सांगून टाका. लग्न थाटामाटातच करायचे आहे म्हणून!‘ त्या सर्वांचेच त्यावर एकमत झाले. मग त्यासाठी स्नेहभेटीच्या निमित्ताने मुलीच्या घरी जाऊन एक बैठक घ्यायचेही ठरले. त्याप्रमाणे मुलीकडच्यांना फोनही केला. सुटीच्या दिवशी भेटीसाठी संध्याकाळची वेळ ठरली. मुलगा या सगळ्या प्रक्रियेत सहभागी नव्हता. पण हा सारा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत होता. आता सगळेच मोठे असल्याने त्याला मध्येच असे बोलणे बरे वाटले नाही.
स्नेहभेटीतील बैठकीचा दिवस जवळ जवळ येत होता. मुलीला हा सारा प्रकार सांगणे मुलाला बरे वाटले नाही. त्याची आतल्या आत कुचंबणा होत होती. दरम्यान नातेवाईक आणि मुलाची आई मुलाच्या लग्नाच्या भव्यतेचे स्वप्न रंगवत होते. तर याची घुसमट आणखीनच वाढत होती. तरीही त्याने "हे सगळं थांबवा‘ असा आग्रह केला. पण "तू आमच्यात पडू नको‘ म्हणत त्याला रोखण्यात आले. आता त्याचा संयम सुटत चालला होता. तरीही तो काही करू शकत नव्हता.
स्नेहभेटीनिमित्त होणाऱ्या बैठकीचा दिवस उजाडला. तोपर्यंत सर्वांनी तयारी पक्की केली होती. भूमिका ठाम आणि स्पष्ट ठेवण्याची तयारी केली होती. मुलालाही येण्याचा आग्रह धरण्यात येत होता. पण त्याने स्पष्ट नकार दिला. तो सकाळीच बाहेर कुठेतरी निघून गेला. भेटीची वेळ संध्याकाळची होती. दिवस पुढे जात होता. सर्वांची उत्सुकता वाढत होती. या सर्वांत सकाळी बाहेर पडलेला मुलगा परत आलाच नसल्याचे कोणालाच भान नव्हते. साधारण दुपार उलटत होती. दुपारचे पाच वाजत होते. तासाभरात निघण्याची वेळ होणार होती. दरम्यान दारावरची बेल वाजली. दार उघडायला त्याची आई गेली. दार उघडल्यानंतर तिला जबरदस्त धक्का बसला. कारण समोर तिचा मुलगा लग्न ठरलेल्या मुलीसोबत लग्न करून घरी आला होता. ‘तुम्ही माझे ऐकत नव्हता. मलाही ते सांगता येत नव्हते. मग काय आम्ही माझ्या आणि तिच्या कोणाच्याच घरी न कळवता थेट नोंदणी पद्धतीने लग्न केले आणि आलो घरी‘, त्याने खुलासा केला.
(Courtesy: eSakal.com)
0 comments:
Post a Comment